बाळासाहेब आंबेडकर यांच्या भेटीने सांगवीकारांना दिलासा

। हन्नूर : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बोरी उमरगा रामपूर शिरशी या गावांमध्ये अतिवृष्टी मुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे व त्याचबरोबर शेतीचे सर्व पिके नासधूस झाल्यामुळे याची पाहणी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगवी बु गावाला भेट दिली या भेटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना व अतिवृष्टी धारक शेतकर्यांना जणू दिलासाच मिळाला आहे. कारण बाळासाहेब आंबेडकर यांनी या सर्व प्रकारची माहिती लोकांपर्यंत जाऊन घेतले आहे.
कालच्या मुख्यमंत्र्यांच्या दौर्यावर ती लोकांनी प्रश्न उपस्थित करुन आमचे मूळ प्रश्न न ऐकताच मुख्यमंत्री निघून गेले अशी भावना एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर व्यक्त केली. लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी भावना लोकांनी उपस्थित केली.पुराची तशीच परिस्थिती असेल तर पुनर्वसनासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली.
त्याचबरोबर राज्याची जबाबदारी असून राजांनी लवकरात लवकर मदत जाहीर करावी असेही त्यांनी मुख्यमंत्र्याला या सर्व प्रसंगी आपण मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहोत असे सांगितले यावेळी सांगवी गावातील महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या आपणच आपले आमचे माय बाप आहोत आम्हाला न्याय द्या अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी प्रदेश प्रवक्ता आनंद चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष नाना कदम जिल्हा कार्याध्यक्ष बबन शिंदे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे शीला मनी बनसोडे संदीप मडिखांबे, ज्योतिर्लिंग स्वामी देवानंद अस्वले राहुल मोरे आनंद मोरे, सुभाष ओहळ, तुकाराम पारसे रवी पोटे बबन गायकवाड गौतम गायकवाड नितीन शिवशरण अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.