विमा उतरविलेल्या सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकर्यांनी अर्ज करावेत

अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये परतीच्या सर्वदूर पाऊस होत असून सोयाबीन पिकांचा पिकविमा उतरविलेल्या शेतकर्यांचे सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकर्यांनी सोयाबीन काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी ठेवलेले होते अशांचे या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर अशा शेतकर्यांनी ई-मेल, गुगल अॅप किंवा कृषी विभाग कार्यालय अक्कलकोट येथे अर्ज करावेत असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर यांनी केले आहेत.
बुधवार व गुरुवारी झालेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादित शेतकर्यांचे शेतातील काढणीस आलेल्या व रास करण्यासाठी गोळा करुन ठेवलेल्या सोयाबीन पिकाचा नुकसान झाला असेल अशा शेतकर्यांनी सोयाबीनचा विमा उतरविला आहे. ‘काढणीपश्चात नुकसान भरपाई’ या सदराखाली पिक विमा मिळू शकतो यासाठी पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करून वाळविण्यासाठी पसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून 14 दिवसात गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकर्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान काळविताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळवणे ही बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करेल यामध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषि अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल, पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल 10 दिवसात सादर करण्यात येईल. या विम्याचा जास्तीत जास्त शेतकर्यांना लाभ मिळावा यासाठी तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या पथकांनी सापळे, बादोले बु, किणीवाडी, किणी, चुंगी, हन्नूर नदीकाठच्या सर्व गावांना भेटी देवून सोयाबीन कापणी व रास करण्यासाठी गोळा करुन ठेवलेल्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना ‘काढणीपश्चात नुकसान भरपाई’ या सदराखाली पिकविमा मिळू शकतो. ज्याशेतकर्यांनी पिकविमा भरलेला आहे, ज्या शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकर्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स हे अॅप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18001037712 या टोल फ्री क्रमांकावर किंवा र्लीीीेांशी.ीर्शीींळलशऽलहरीरींळरुर.लेा या ई-मेल वर किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुर्यकांत वडखेलकर यांनी केले आहेत.